Posts

Showing posts from July, 2020

गोष्ट एका मंदिराची...!!

Image
 "वाघेश्‍वर" मावळ तालुक्याच्या पश्‍चिमेला असणारं छोटंसं गाव! तसं पाहिलं तर जिल्ह्याच्याच  नव्हे तर तालुक्याच्याही नकाशात हे गाव शोधताना दमछाक होईल. इतकं याचं अस्तित्व लहान आहे.इथला  सारा भाग पवनमावळ म्हणून ओळखला जातो.पवना नदीच्या काठचा हा परिसर.मोहक..आणि तितकाच निसर्गरम्य!         साधारण पन्नास   वर्षांपूर्वी याच गावासारखीच आजूबाजूची काही गावे पवना धरणाखाली गेली आणि आजूबाजूला विस्थापित झाली. या गावच्या जमिनीबरोबरच येथली देवळे, वाडे, घरे आदींना जलसमाधी मिळाली.ह्या साऱ्या वास्तू शिवकाळातील होत्या  तर मंदिरे मात्र अगदी हेमाडपंथी धाटणीचीच होती. परंतु  हे सारं काही पाण्याखाली गेलं आणि आपण सर्वजण या अनमोल अशा वैभवशाली ठेव्याला मुकलो.तसं पाहिलं तर पवनमावळचा हा सारा परिसरच तुंग-त्रिकोणा-लोहगड-विसापूर अशा ऐतिहासिक किल्ल्यांच्या कोंदणात स्थित आहे. त्यामुळे या अशा किल्ल्यांच्यापायथ्याशी असणारी ही गावेसुद्धा इतिहासातून तावून-सुलाखून निघालेली होती यात शंकाच नाही. मावळातील या  किल्ल्यांवर जशी उत्कृष्ट बांधकामे, स्थापत्याची ...

निसर्गवारी !!

Image
काही स्थळांना ट्रेकर्स मध्ये मानाचे स्थान आहे.यापैकीच एक अग्रणी ठिकाण म्हणजे भीमाशंकर .भीमाशंकरचा ट्रेक करणारे अनेक ग्रुप नेहमीच वेगवेगळ्या वाटांच्या शोधात असतात. त्यातलीच एक विलोभनीय वाट आहे ती भोरगिरी ते भीमाशंकरची. निसर्गरम्य अशा या वाटेवरून भीमाशंकरला पोहोचण्याचा अनुभव काही वेगळाच आहे. ‘भोरगिरी ते भीमाशंकर’ हा कित्येक पट्टीच्या टेकर्स आणि भटक्यांचा पायी चालण्याचा राजमार्ग आहे. वारकरी ज्या भावनेने विठुरायाकडे पंढरीच्या वारीसोबत पायी चालत जातात, अगदी त्याच भावनेने अनेक जण ‘भोरगिरी ते भीमाशंकर’ यासारखा भन्नाट ट्रेकरूट निवडतात. या दोन्ही भावनेत फरक इतकाच की वारक-यांना पायी चालण्याची ओढ विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणजेच भक्तीची असते तशीच आपल्यासारख्या ट्रेकर्सना असते ती ओढ निसर्गाच्या प्रेमाची अन् त्याला कवेत घेण्याची. त्यामुळेच डोक्यावर धो-धो पाऊस कोसळत असताना, चिखलवाट तुडवत जाताना, निसर्गाला जवळून अनुभवताना चालत राहणं किती आनंददायी असतं हे इथं आल्याशिवाय बहुधा कधीच कळणार नाही. म्हणूनच अनेक टेकर्स दरवर्षी  अगदी न चुकता भोरगिरी ते भीमाशंकर निसर्गवारी करतात. भोरगिरी परिसरातील पा...

मी, पाऊस...... आणि सह्याद्री!!

Image
रविवारचा दिवस होता. बाहेर पाऊस बेभान होऊन धो-धो कोसळत होता. सारी सृष्टी हिरवीगार झाली होती. या साऱ्या वातावरणाचा मान ठेवून   आम्ही पाच जण पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या चाकण मार्गे राजगुरुनगरहून भोरगिरीला चाललो होतो. सह्याद्रीच्या शब्दशः कुशीत असलेल्या या भोरगिरीला पावसाळ्यात जायचच हा शिरस्ता खूप वर्षापासून आहे. या नियमाला कारणेही बरीच आहेत म्हणा. गर्दीच्या गोंगाटापासून दूर आणि लोकांच्या पावसाळी उन्मादापासून हे ठिकाण अजून तरी बचावलं आहे. आता तिथंही वर्दळ वाढत चालली आहे म्हणा. पण अजून तरी पाहिजे तसा निसर्गाचा कॅनव्हास बऱ्यापैकी न्याहळता येतो. यामुळे तरी हे ठिकाण माझ्या पसंतीस उतरलेलं आहे. त्यामुळे मजल-दरमजल करीत या भोरगिरीला सकाळी लवकर पोहचलो. येथून भीमाशंकरला जायचा बेत होता. भोरगिरी ते भीमाशंकर हा पायी तीन तासांचा प्रवास म्हणजे पावसाळ्यातला उत्कर्षबिंदूच! जेव्हा आम्ही   भोरगिरीला पोहचलो तेव्हा चहूबाजूंनी वेढलेले डोंगर... त्यावरून कोसळणारे धबधबे... लालसर पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे... हे दृश्य समोर आले अन अक्षरशः स्तब्धच होऊन गेलो. ज्या निसर्गसोहळ्य...